नवीन लेखन...

दिग्दर्शक गोविंद घाणेकर

दिग्दर्शक

दिग्दर्शक गोविंद घाणेकर यांचा जन्म १५ जून १९११ रोजी झाला.

गोविंद घाणेकर हे मूळचे सातार्याफचे. ते मॅट्रिक झाल्यावर अनेक लहानमोठे उद्योग करत असतानाच त्यांची बी.पी.सामंत यांच्याशी गाठ पडली. त्यांच्याकडे ते सुमारे आठ वर्षे म्हणजे १९३३ ते १९४० पर्यंत होते. या काळात त्यांनी मुंबईच्या ‘नवाकाळ’ वर्तमानपत्रातही लेखन केले. घाणेकर १९४० मध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’त निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले. ‘प्रभात’च्या परंपरेतले सर्व गुण गोविंद घाणेकर यांच्या अंगी उपजतच होते. विशेषत: व्यावसायिक शिस्त व कामातील सफाई व कौशल्य या गुणांचा त्यांनी नंतर स्वत: काढलेल्या चित्रसंस्थेत फार उपयोग झाला.

प्रभातच्या ‘संत जनाबाई’ या १९४९ सालच्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. ते १९५१ ते १९५५ पर्यंत ‘फेमस पिक्चर्स’ व १९५५ ते १९६१ पर्यंत ‘इंडियन नॅशनल पिक्चर्स’चे महाव्यवस्थापक होते. या दोन्ही संस्थांसाठी त्यांनी अनेक जाहिरातपट तयार केले. त्यांनी सुधीर फडके यांच्या ‘वंशाचा दिवा’ (१९५०), माणिक चित्रचा हिंदी-मराठी ‘शिवलीला’ व पांडुरंग कोटणीस यांचा ‘भल्याची दुनिया’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. गोविंदरावांनी जाहिरातक्षेत्रात वेगळं विश्व निर्माण केलं. नंतर १९६१ साली गोविंदरावांनी ‘ट्रायोफिल्म’ नावाची जाहिरातपट काढणारी स्वत:ची चित्रसंस्था सुरू केली. त्यानंतर ‘सह्याद्री फिल्म्स’ ही संस्था काढली. श्याम बेनेगल यांनी गोविंदरावांच्या संस्थेतच आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली.

गोविंदरावांच्या मार्गदर्शनाखाली जाहिरातपट तयार करतानाच श्याम बेनेगल यांच्या प्रतिभेला अंकुर फुटला. त्यामुळे समांतर चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावंत दिग्दर्शक मिळाला. गोविंद घाणेकर हे अतिशय परोपकारी वृत्तीचे ‘भला माणूस’ होते. दादरच्या ‘पाम व्ह्यू’मधील त्यांच्या घरी त्यांचे मित्र ग.दि. माडगूळकर व त्यांचा गोतावळा यांचा कायम राबता असे. आध्यात्मिक वृत्तीचे गोविंद घाणेकर हे गुरुदेव रानडे यांचे शिष्य होते. गोविंद घाणेकर यांच्या ‘इंडियन नॅशनल पिक्चर्स’ने जाहिरातपटाऐवजी एक मराठी चित्रपट काढायचं ठरवलं. गोविंद घाणेकर चित्रपटकलेला फार महत्त्व देत. त्यांनी शहराप्रमाणे ग्रामीण भागातही चालेल अशा कौटुंबिक विषयावर – कुटुंबनियोजनासारख्या राष्ट्रीय समस्येच्या विषयावर चित्रपट काढला. कथा- पटकथा-संवाद-गीते गदिमांनी लिहिली, तर बाबा पाठकांनी दिग्दर्शन केलं. चित्रपट होता ‘प्रपंच’. या चित्रपटाला राज्य सरकारचे सात पुरस्कार तर दिल्लीत सर्व भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. पुढे युनेस्कोने हा चित्रपट विकत घेऊन तो जगातील बेचाळीस भाषांमध्ये डब केला.

गोविंद घाणेकर यांचे १४ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..