नवीन लेखन...

दृष्टी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता


रोज देतसे पुन्हा पुन्हा मी, मनास खमकी तंबी;
नकोत कुबड्या आधारा वा, जगणे परावलंबी

पाय नीतीचे, पाऊल हे ना, कधी पडो वाकडे;
हेच घालतो लीन होऊनि, शुभंकरा साकडे

हात राबूनी नम्र जुळावे, माणुसकीवर भक्ती;
साथ द्यावया त्या बाहुना, ज्ञान-तुक्याची शक्ती

धमन्यांमधुनी अखंड वाहो, सृजनशक्तीचे रक्त;
रक्तामधल्या पेशीपेशीत, स्वत्वामधले सत्त्व

सुमंगलाचे स्वप्नचं व्हावे, ह्या जगण्याचे कारण;
तरून जाण्या भवसागर हा, विवेक व्हावा तारण

पूर्णत्वाचा ध्यास उरावा, निर्मुन अव्वल दर्जा;
श्वासामधुनि वाहो प्रगती, अखंड घेऊन ऊर्जा

कर्मभूमीवर सिंचन करण्या, घामच होईल पाणी;
कथा सांगण्या यशोफळाची, कामच होईल वाणी

हृदयी सागर करुणेचा तर, निर्मितीस त्या अर्थ;
संत नसे जर अंतरातला, समृद्धीही व्यर्थ

वेध भविष्या तुझा घ्यावया लाभो विशाल दृष्टी;
आशांचे नवकिरण व्यापुदे, प्रकाशणारी सृष्टी

– वैभव दळवी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..