नवीन लेखन...

जालना शहराच्या रस्त्यावरील कलंदर कवी : शम्स जालनवी 

जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलतेसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायऱ्यासाठीही परिचित आहे. अनेक प्रतिभाशाली उर्दू शायर आणि त्यांना दाद देणारे रसिक या शहराने पाहिलेले आहेत. एके काळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण ऊर्फ शोला यांच्या नावाचा महत्त्वाच्या ठिकाणी चौक निर्माण करणारे हे शहर ! अशा या शहरातील महम्मद शमसोद्दीन ऊर्फ शम्स जालनवी हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या अर्धशतकापेक्षा अधिक काळ मुशायरे गाजवत आहेत.

वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटून गेलेल्या ‘शम्स’ यांची प्रकृती आजही चांगली आहे. ते एवढे तंदुरुस्त आहेत की आजही सकाळी पाच वाजता उठून सायकलवरून बसस्थानकात पोचतात आणि तेथे बाहेरून आलेली उर्दू वृत्तपत्रे घेऊन त्यांच्या वाटपासाठी मार्गस्थ होतात. शहरभर सायकलवर फिरून वृत्तपत्रवितरण करणे हा त्यांचा चरितार्थाचा व्यवसाय. पूर्वी काही काळ त्यांनी एका ऑईल मिलमध्ये नोकरी करून पाहिली, परंतु ते काही जमेना म्हणून ते वृत्तपत्रवितरणाच्या कामास लागले. त्यांच्या दोन मुलांपैकी एक सध्या या व्यवसायात त्यांच्या मदतीला आहे. उर्दू वृत्तपत्रांचे ग्राहक कमी आणि साहजिकच यामुळे ‘शम्स’ यांना वितरणामधून मिळणारे उत्पन्नही मर्यादित. परंतु ते मात्र मोठ्या चिकाटीने, जिद्दीने, उन्हाळा असो की हिवाळा-पावसाळा सायकलीच्या पॅडलवरून लांब – लांब टांगा मारत शहरभर फिरतात. जवळपास पावणेसहा फुटांची उंची, पांढरीशुभ्र दाढी असलेल्या आणि अथक वृत्तीने वावरणाऱ्या ‘शम्स’ यांचा साहित्यरसिकांना जवळचा परिचय आहे.

शिक्षक असलेल्या थोरल्या भावामुळे त्यांनी शायरीत अधिक रस घेण्यास सुरुवात केली. प्रारंभीचा काळ असा होता की, काही मंडळी सलोख्यामुळे त्यांच्याकडून प्रसंगानुरूप शायरी लिहून घेऊन एखाद्या शेर -कार्यक्रमात संचलन किंवा अन्य निमित्ताने सादर करत. परंतु त्यांच्या थोरल्या भावाने ‘शम्स’ यांना स्वतःच्या नावाने शेर शायरी सादर करण्याची सूचना केली. त्यानंतर ‘शम्स’ यांचे शेर-शायरी आणि उर्दू गझलच्या प्रांतातील स्वतंत्र अस्तित्व रसिकांना जाणवू लागले. त्यांची पहिली रचना एका हिंदी मासिकात छापून आली त्यास आता जवळपास पंचावन्न वर्षे उलटून गेली आहेत. ती आठवण आजही ‘शेम्स’ यांच्या मनात अगदी ताजी असल्यासारखी आहे. त्यापूर्वी त्यांच्या रचना कागदावर जरी उतरल्या तरी त्यास मुद्रित स्वरूप प्राप्त झालेले नव्हते.

जहर – ए – कातील है, अगर

हुस्न तो अमृत भी है

एक तवायफ की सोचो

वो औरत भी है।

१९५८ साली छापून आलेली ‘शम्स’ यांची ही पहिली रचना त्यांची उमेद आणि उत्साह वाढवणारी ठरली. त्यानंतर या पहिलवानाने शायरीची मैफलही गाजवणे सुरू केले. त्यांचे वडील पहेल-वान होते आणि तो कित्ता ‘शम्स’ यांनीही बालपणापासून गिरवण्यास प्रारंभ केला होता. त्यांच्या वयाची आज पंच्याऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही त्यांच्या तंदुरुस्त प्रकृतीचे रहस्य शरीरसंपत्तीकडे बाल-पणापासून लक्ष दिलेल्या व्यायामातही आहे. त्यामुळेच हा ‘सूर्य’ (‘शम्स’ याचा अर्थ सूर्य) अरुणोदय होण्याच्या आधीच एवढ्या वयातही सायकल घेऊन जालना. शहराच्या रस्त्यावर प्रकाशात असतो !

‘तमाजत’ (सूर्याची उष्णता) हा त्यांचा उर्दू रचनांचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. २००५ मध्ये हाच संग्रह देवनागरी लिपीत ‘मध्यान्ह का सूर्य’ या नावाने प्रकाशित झाला. भाव-भावना, सुख-दुखांच्या आठवणी, विविध पातळ्यांवरील संघर्ष इत्यादींच्या कोलाहलातून मनात उमटणारे प्रतिबिंब ‘शम्स’ यांच्या रचनांमध्ये उमटलेले दिसते. अनेकदा आपल्या वैयक्तिक पातळीवरील या अनुभवविश्वास व्यष्टीकडून समष्टीकडे नेताना त्यास ते समर्थ, वजनदार आणि भारदस्त शब्दांची जोड देतात. रस्त्यावरच्या गर्दी आणि कोलाहलात फिरतानाही स्वतःच्या जगण्यातील अर्थ शोधताना ते परखडपणे सांगूनही जातात की

-जर्द-जर्द चेहरे है जख्म दिलके गहरे है

वक्त है तमाशाई,

वो तसल्ली देते है जख्म पर नमक

रखकर खुब है मसाहाई !

(पिवळे चेहरे आणि काळजातील जखमा खूप खोलवर असून काळ आमचा तमाशा बघत आहे. ते तर खोटे दिलासे देताहेत आणि तेही जखमेवर मीठ चोळून! व्वा, काय पण उपचार आहेत !)

जीवनात कितीही अपेक्षा असल्या आणि आजच्यापेक्षा उद्याचा दिवस अधिक चांगला तसेच मनासारखा उजाडावा असे वाटत असले तरी तसे घडेलच असे नव्हे! जीवनातील संघर्षात ही सर्व धडपड चालू असताना एखाद्या वळणावरील अपयशानंतर कुणी सावरण्याचा प्रयत्न करत असेल तर आसपासची माणसे त्याला साथ देण्याची किंवा सहानुभूती व्यक्त करण्याची भूमिका बजावतीलच याबद्दल शाश्वती नसते. त्यामुळे आपल्या एका ‘मुक्तका’त ते म्हणतात

बिगडने को संवरने नहीं देती

दुनिया कश्ती से उभरने नहीं देती दुनिया

जख्मोंपर छिडकती है नमक हस हसकर

जख्मों को भी भरने नहीं देती दुनिया

वर्तमानपत्रे विकतानाच वर्तमानाचे तटस्थपणे निरीक्षण करणाऱ्या या कवीच्या मनात भूतकाळातील अनेक अनुभवांची जंत्री आहे. अनेकदा कळत असूनही माणूस इतरांकडून चांगल्या अपेक्षा करतो, त्याबद्दल ‘शम्स’ यांची पुढील रचना प्रसिद्ध आहे –

मेरा मन कितना पागल है

कांटोसे खुशबू की आशा,

जहर से जीवन मांग

रहा है सुखे पेडसे छाया मांगे

पत्थर दिलसे माया मांगे

गुंगेसे वह प्यार की बोली

निर्धनसे धन मांग रहा है ।

खुशबू कागज के फुलोंसे

ठंडक भडके हए शोलोंसे

हुए: अंधोसे आंखोंकी ज्योती

और दर्पण मांग रहा है ।

‘शम्स’ यांची ही रचना मुशायऱ्यात सर्वांची दाद आणि वन्समोअर घेऊन जाणारी असते. कारण ही रचना ते आपल्या दर्दभऱ्या आवाजात गाऊन सादर करतात. त्यांच्या या सादरीकरणात एक अंगभूत लय आणि सहजता असते. त्यांच्या आवाजातील दर्दभरी तलमता रचनतेली आशयाला अधिकच गहिरेपण देणारी असते. कोणताही मुशायरा असो ‘शम्स’ यांना या रचनेचे सादरीकरण करावेच लागते. समोर किती संख्येने श्रोते आहेत आणि ते जाणकार आहेत की नाहीत, याच्याशी ‘शम्स’ यांना काही देणे-घेणे नसते. दिल्लीतील अखिल भारतीय पातळीवरचा मुशायरा असो की जालना शहरातील गल्लीबोळातील एखाद्या दुकानातील दोन रसिक असोत, ‘शम्स’ यांना ही रचना सादर करण्याचा आग्रह होतो आणि तेही तेवढ्याच उत्साहाने ती पेश करतात. ही रचना सादर होताना उर्दू भाषेशी संबंध नसणारा किंवा कोणत्याही भाषेतील कवी संमेलनास हजेरी न लावणारा श्रोता उपस्थित असेल तर तो आपसूक ‘शम्स’ यांच्याकडे ओढला जातो!

ही किंवा अन्य कोणतीही रचना ते सादर करतात तेव्हा त्यामागे उसने अनुभवविश्व नसते, तर त्यामागे अस्सल जीवनानुभव असतो. अनेकदा त्यांच्या गीत, गझल किंवा मुक्तकांच्या स्वरूपातील रचना या वैयक्तिक जीवनातील अनुभवांवर आधारित असल्या तरी श्रोत्यांनाही त्याच अनुभूतीची आठवण करवून देणाऱ्या असतात!

 

दिवसानंतर रात्रीचे येणे अपरिहार्य असले तरी ती अनेक

आठवणी घेऊन येते हे सांगताना ‘शम्स’

म्हणतात 

सो गया सूरज, जागे तारे, आग लगाने

आयी शाम 

भुली – बिसरी याद दिलाकर मनको

जलाने आयी शाम | 

चांद का मुखडा, नैन रसिले रह

रहकर याद आते है

कट गया दिन तो जैसे – तैसे, फिर

तडपाने आयी शाम | 

किस को खबर थी, ये जालीम भी

लहू की प्यासी है 

मैं समझा था, लोरिया गाकर मुझको

सुलाने आयी शाम । 

किससे कहू मैं विपदा अपनी, सोने

चले अब तारे भी 

कल आऊंगी, जाते-जाते याद दिलाने

आयी शाम । 

‘शम्स’ गिले शिकवे रहने दो, मांग

सितारोंसे भर दो, 

ओढ के सर पे लाल चुनरिया, घुंघट

ताने आयी शाम । 

एकीकडे अशी रचना करणारे ‘शम्स’

अनेकदा स्पष्ट बोलताना म्हणतात

 चिराग-ए-आरजू-ए-दिल को

भडकाने नहीं आता

हमे झुठी तसल्ली दे के बहलाना नहीं 

आता जीवनानुभवातील वास्तव आपल्या रचनांमधून मांडताना रसिक श्रोत्यांच्या अंतर्मनास स्पशून जाण्याची क्षमता त्यांच्या रचनांमध्ये आणि तिच्या ‘तरन्नूम’ मधील सादरीकरणात असते. अशाच एका रचनेत ते म्हणतात-

मोहब्बत हदसे बढ जाने पर

कोई गम नहीं होता

लगा दो आग पानी में

तो पानी कम नहीं होता

हमेशा चढते सूरज की ही

पूजा ‘शम्स’ होती है

बिगड जाती जब किस्मत

कोई हमदम नहीं होता

जीवनातील नकोशा असणाऱ्या अनेक आठवणी मनात घर करून राहतात आणि त्यांना बेचैन करतात. वैयक्तिक स्वरूपात ‘शम्स’ च्या अंतर्मनास ढवळून करणाऱ्या या कोलाहलातून त्यांच्या रचना आकारास येतात. या सर्व अनुभवातून ते निराशा होत नाहीत तर नव्या उभारीने जगण्यासाठी परमात्म्याकडे पुढील मागणी करतात –

शिशा हूं, पत्थर का जिगर दे अल्लाह

फिरसे मुझे जीने का हुनर दे अल्लाह

जीवनाविषयी आशावाद ठेवून परमात्म्याकडे ते सहन करण्याची आणि त्याचप्रमाणे ते जगण्याची कला मागणारे ‘शम्स’ कधी-कधी इतरांना समजुतीने वागण्याचा सल्लाही देतात, तो पुढीलप्रमाणे

सबको मनकी बात बताना ठीक नहीं,

बदनामी का पेड लगाना ठीक नहीं।

प्यार के फुले-फले रिश्ते आबाद रहे,

आंगन में दिवार उठाना ठीक नहीं।

इन्सौही इन्सानों के काम आता हैं,

कर के फिर एहसान जताना ठीक नहीं ।

हिम्मत है तो जुल्म का सीना चाक करो, 

कमजोरों पर हाथ उठाना ठीक नहीं ।

शौकसे तुम दिनरात मनाओ रंगरलीयां,

बंद कलींको फूल बनाना ठीक नहीं ।

रौंदी हुई राहों को मूडकर मत देखो,

बीती बातों को दोहराना ठीक नहीं!

देखो दुनिया को दुनिया की नजरसे,

होशमें आओ ‘शम्स’ जमाना ठीक

नहीं । 

दैनंदिन जीवनात विश्वासघाताचे

आणि ज्यांच्यावर भरवसा ठेवला.

त्यांच्याकडूनच फसवणूक झाल्याचे

अनुभव आलेल्यांना ‘शम्स’ यांची पुढील

रचना निश्चितपणे विचार करायला

लावील. 

फरेब देने लगे जब मेरे ही साथ मुझे

किसी के प्यार का कैसे यकीन आये

मुझे ।

 मेरी तो उम्रही कांटोमें सरबसर गुजरी

न रास आये चमन के गुलों के साए

मुझे । 

उसे भी दौरे तरक्की की देन ही समझो

पराए अपने तो अपने लगे पराए मुझे ।

स्वातंत्र्यपूर्व काळात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर करावीत पुढील शिक्षण झालेले ‘शम्स’ स्वतःच्या आणि आसपासच्या जीवनातील द्वंद्वाचे तसेच संघर्षाचे साक्षीदार आहेत. अनेकदा या जीवनातील भोक्त्याच्या भूमिकेतूनही त्यांना जावे लागलेले आहे. परंतु स्वतःकडे आणि आसपासच्या व्यक्तींकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता असल्याने ते कवितांच्या माध्यमातून या जीवनानुभवाचे भाष्यकारही बनलेले आहेत. परंतु आपल्या रचनांमधून नेमका जीवनानुभव आणि त्यावर मत मांडणारे ‘शम्स’ स्वतःच्या मर्यादांची जाणीव नम्रपणे व्यक्त करताना म्हणतात की

तेरे चेहरे का भरम खुल जाएगा

राह में आइनाखाने बहुत ।

‘शम्स’ रखिए अपनी चादर का

खयाल लग गए तुम पाँव फैलाने बहुत ।

असा हा जालना शहरातील कलंदर कवी ! वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटूनही कायम उत्साहात असणारा, उर्दू शायरीवर भरभरून बोलणारा. पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ देशभर अनेक प्रसिद्ध उर्दू कवींसोबत मुशायरा गाजवणारा परंतु त्याचा गर्व न बाळगणारा !

अतिशय साधेपणाने जगणारा आणि सायकलीवर फिरणारा हा वयोवृद्ध इसम अनेक मुशायऱ्यांवर अधिराज्य गाजवणारा असेल, असे त्यांना प्रथमतःच पाहणाऱ्यांना वाटणार नाही. कोणताही डामडौल नाही आणि अहंकाराचा दर्प नाही अशी अवस्था असणाऱ्या ‘शम्स’ यांचे साधेपण व्यक्त करायचे तर त्यांच्याच पुढील रचनेचा आधार घेता येईल-

मुझे पुछते है वो इस तरह मेरा नाम ले के गैरसे

सर – ए – शाम क्या वही ‘श्मस’ था जो अभी यहांसे गुजर गया ।

(सौजन्य : ‘शब्दरुची) ‘

लक्ष्मण राऊत, जालना.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..