नवीन लेखन...

जेष्ठ हिंदी कवी, लेखक पं. नरेंद्र शर्मा

जेष्ठ हिंदी कवी, लेखक पं. नरेंद्र शर्मा यांचा जन्म. २८ फेब्रुवारी १९१३ रोजी उत्तर प्रदेशतील जहागीरपूर येथे झाला.

पं.नरेंद्र शर्मा यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. नरेंद्र शर्मा यांनी अलाहाबाद विद्यापीठात अध्यापनशास्त्र आणि इंग्रजी मध्ये एम.ए केले. १९५३ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणीत नोकरी सुरु केली. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.

आजच जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. विविध भारतीची सुरुवात २ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाली.१९५७ साली आकाशवाणीचे तेव्हाचे महानिर्देशक गिरिजाकुमार माथुर यांनी एक अशी रेडियो चालू करण्याची कल्‍पना मांडली की ज्यात विवीधता असावी. त्यामुळे या रेडिओचे नाव विविध भारती पडले. नरेंद्र शर्मा व गोपालदास यांनी त्यांना सहयोग दिले. विविध भारतीवर पहील्या गाण्याची सुरवात संगीतकार अनिल विश्‍वास यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत पं. रविशंकर यांनी दिले होते.

मुंबई टॉकीज आणि देविका राणी युसूफ खान पठाण, (दिलीप कुमार) यांचा ‘ज्वार-भाटा’ चा नायक म्हणून विचार करत होते. तेव्हा नरेश शर्मा यांनी युसूफ खान पठाण हे नाव दिलीप कुमार नाव सुचवले. पं. नरेंद्र शर्मा, यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. पंडीत नरेंद्र शर्मा यांना लता मंगेशकर या आपले संगीत गुरू मानत. पंडित नरेंद्र शर्मा यांचे ११ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे पंडित नरेंद्र शर्मा यांना आदरांजली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4386 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..