MENU
नवीन लेखन...

गंध व्हा

गंध व्हा, उधळा स्वतःला फूल आधी व्हा तुम्ही रंगवुनी ह्या जगाला इंद्रधनुषी व्हा तुम्ही उजळण्या हे विश्व सारे उजळणारी ज्योत व्हा ज्योत म्हणुनी मिरवताना राख बनण्या सिध्द व्हा विश्व सारे उजळताना ज्योत जळते अंतरी प्रेमपक्षी फुलवताना चंद्र झुरतो अंबरी व्हा प्रकाशी गा मनाशी गीत व्हा विश्वातले जीवनाचे व्हा प्रवासी शब्द व्हा गीतातले कोवळे ऊन व्हा अन् […]

माझं कोकण

स्वसामर्थ्याच्या तपोबलाने, सागरास मागे हटवून परशुरामाने निर्माण केला, हा प्रदेश सुंदर कोकण वळणावळणाची आहे, माझ्या कोकणची वाट किती वर्णावे सौंदर्य तियेचे, सौंदर्याचा थाट जरी बदलली अवघी दुनिया, जरी बदलला काळ माझ्या कोकणच्या मातीसंगे, जुळली माझी नाळ शहरात राहिलो, तरी खुणावते कोकणातली माती कौलारू घर कोकणातले, दिसते या डोळ्यांपुढती देशामध्ये स्वातंत्र्याची, ज्योत जयांनी चेतविली स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीची, ही […]

कोकणातील कातळशिल्पे

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे. […]

म्हावरा

खडखडे लाडू नि, मालवणी खाजा; जेवणाक म्हावरा व्हया, फडफडीत ताजा रोज आमच्या चुलीर, म्हावराच शिजो झक मारत जावंदे तो, बर्गर नी पिझ्झो जिताडा, सरंगो, रावस नि तारली; डेंग्यांका मोडून आमी, खाताव ती कुर्ली पापलेट , सुरमय , बांगडो का मिळो; वासावर सांगतलाव, ताजो की शिळो नीट करून झालो, सुंगठ्याचो वाटो; की वाटपाक वल्या व्हयो, वरवंटो-पाटो धणे-मिरी, […]

कोकणातील पत्र(क)कारिता

कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे. […]

कोकणभूमीतील घरगुती व्यवसाय

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे. […]

ग्रामसडक ते हमरस्ता

वरवर पाहता प्रमुख रस्त्यांचं जाळं कोंकणात विणल्याचं दिसत असलं तरी राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य रस्त्यांमध्ये सलगता आणि थेट जोडलेपणा यांचा अभाव आहे. […]

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरे

कोकणात घरांच्या रचनेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथले वातावरण, जेव्हढे ऊन तेवढाच पाऊस. ओल्या दमट आणि गरम हवामानामुळे घरांमध्ये नैसर्गिक गोष्टींचा पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. पावसामुळे घरांमध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे उतरत्या कौलांची घरे. या मातीच्या कौलांमुळे धुवांधार पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कडक उन्हाळ्यात देखील घरातील हवा थंड राहते. […]

कोकणातील राजकीय परंपरा

अखंड कोकणात जसे काँग्रेसी विचारांचे प्राबल्य होते तसे समाजवादी विचारांचा भारी पगडा होता. कार्यकर्ते आणि राजकारणही विचार, निष्ठा, सामाजिक बांधिलकी यावर आधारलेले होते. परंतु त्याकाळच्या शिवसेनेतही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातीलच कार्यकर्ते होते. शिवसेनेतही मुंबईचा पहिला महापौर होण्याच भाग्य प्रि. वामनराव महाडिकांना लाभलं होतं. तत्पूर्वी काँग्रेसच्या स. का. पाटील या मालवणी सूपूत्राची मुंबापुरीवर हुकमत होती. जवाहरलाल नेहरू यांचे स. का. पाटील यांच्याशी फार जवळीक होती. […]

कोंकणातील मंदिरे काल, आज आणि उद्या

कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत. आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..