
हेमंत गोविंद यांना स्वत:च्या लहानपणापासून समाजातील गरीब तसंच उपेक्षित जनतेची सेवा करण्याचे ध्येय बाळगले होते. वडिलोपार्जित राजकारणाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे राजकारणात सुरूवातीची काही पाऊले टाकणे त्यांना फारसे जड गेले नसले, तरीदेखील गोरगरीबांच्या मनामध्ये विश्वासाची व प्रेमाची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी त्यांनी निश्चितपणे कष्ट केले आहेत. समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी त्यांची नेमणूक करण्यात आली, यावरून त्यांनी दुर्बल समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान ध्यानात येते. फेब्रुवारी २००७ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व जिल्हा परिषदेवर निवडून आले. ४ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या पदाधिकारांच्या निवडणुकीत त्यांना सभापती समाजक्ल्याण समिती या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवल्या. लघुउद्योग योजनेस मदत म्हणून ७ लाखांवर अधिक खर्च करण्यात आला तर मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांना शिलाई मशीन पुरविण्यासाठी २२ लाखांवर अधिक खर्च करण्यात आला. अनुदानित वस्तिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे, तसेच त्यांना “नाईट ड्रेस” पुरविणे, वस्तीत जोडरस्ते बांधणे,सौरऊर्जा प्रकाश योजना राबविणे, महिला बचत गटांना साहाय्यक अनुदान, स्नानगृहे व शौचालय बांधणी, मागासवर्गीयांना घरे बांधणीसाठी किंवा दुरूस्तीसाठी अर्थसाहाय्य करणे अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या गरजू मुलांना सायकली पुरविण्यात आल्या, तर आर्थिक दृष्ट्या मागसांना घरघंटी पुरविण्यात आल्या आहेत त्यासोबतच अनेक कल्याणकारी कामे हेमंत गोविंद यांनी आजवर केली आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply