
प्रख्यात लेखक व आत्मचरित्रकार म्हणून माधव कोंडविलकर हे महाराष्ट्र तसंच साहित्य रसिकंना परिचयाचे आहेत. माधव कोंडविलकरांनी लिहिलेल्या “मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे” नामक आत्मकथनाने तमाम वाचकवर्गावर आपली अनोखी छाप उमटविली होती. तरूण पिढीच्या असंख्य अव्यक्त महत्त्वाकांक्षांचे भावस्पर्शी चित्रण या आत्मचरित्रात करण्यात आले आहे.
“अजून उजाडायचं आहे”, “काहिली”, “अनाथ”, “वेध”, “भूमीपुत्र”, “डाळं”, “घालीन लोटांगण”, “हाताची घडी तोंडावर बोट”, “एक होती कातळवाडी” या पुस्तकांचं त्यांनी लेखन केले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply