नवीन लेखन...

एका शेवटाची सुरुवात

सजग पालकांना समर्पित !

( वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी .)

— उघड्या दारातून समशेर आत आला , तेव्हा रात्रीचे साडेचार वाजले होते .
आल्या आल्या हायहिल्स कोपऱ्यात भिरकावून अंगावरची साडी ओरबाडून काढून ती बेडवर फेकली . कानातल्या रींग्ज , नाकातली नथ , नेकलेस आणि हातातल्या ओबडधोबड बांगड्या काढून त्या पर्स मध्ये व्यवस्थित ठेवल्या . लिपस्टिक पुसून टाकली . उरलेली व्होडका संपवली आणि तसाच बेडवर अस्ताव्यस्त पडला .

रतीच्या डोळ्यात पाणी आणि घशात हुंदका दाटला .
मात्र रवीच्या डोळ्यात अंगार फुलला होता .

समशेर त्यांचा एकुलता एक मुलगा होता .
मोठ्या हौसेनं समशेर असं नाव ठेवलं होतं . अत्यंत हुषार , देखणा आणि मनमिळावू समशेर पदव्युत्तर शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीत गेला .
आणि आठच दिवसांनी त्यानं सगळे कपडे एकत्र करून बॅगेत ठेवले .

दुसऱ्याच दिवशी त्यानं बॉम्बगोळा टाकला .

” हे कपडे कुणाला तरी देऊन टाका . मला नको आहेत ते .”
त्यानं सांगून टाकलं .
” म्हणजे ? तुला का नकोत कपडे समशेर ? ” आईनं विचारलं .
” एक मिनिट . मी आता समशेर नाही . माझं नवं नाव समशेरनी आहे . आणि मला कपडे नकोत असं कसं होईल . मी आणलेत मला हवे तसे . ”
तो उठला आणि समोरच्या सॅक मधून आठ दहा साड्या काढल्या . परकर , ब्लाऊज आणि बायकांचे दागिने असं सगळं सोफ्यावर टाकलं .

” आजपासून मी आणि आमचा ऑल टाईम जेंडिज ( जेंट्स अँड लेडीज) ग्रुप , अशाच साड्या नेसणार आहोत . ही युनिव्हर्सिटीत आलेली नवी फॅशन आहे . इट्स जस्ट स्टेटस सिम्बॉल . ”

” तू काय हिजडा होतोय का ? की एलजीबीटी वाला ? काय चाललंय तुझं ? शिक्षण सोडून कसले धंदे चाललेत तुमचे ? पुरुषा सारखा पुरूष आहेस ना तू ? आणि विद्यापीठाला हे चालतं ? अरे आमचे काही संस्कार आहेत की नाही ? आमची काही गुणसूत्र आहेत की नाही तुझ्यात ? आपला धर्म , आपली संस्कृती , आपले आचारविचार , आपलं राहणीमान , भविष्याबद्दलचा विचार , शिक्षणाचा स्वतःला आणि देशाला होणारा उपयोग , नोकरी , धंदा याचा काही विचार केलास का ? आणि साड्या नेसायला तू काय …”

रवी संतापानं थरथरत होता . काय करावं हेच त्याला कळत नव्हतं .

कुटुंबाच्या , समाजाच्या संस्कारापेक्षा हा उठवळपणा समशेरला महत्वाचा वाटतो ?

रवीचा संताप अनावर झाला . तो आत गेला आणि पँटचा बेल्ट आणला . समशेरवर हात उचलणार इतक्यात रती पुढं झाली .

” मोठा झालाय तो . त्याला मारून काही उपयोग होणार नाही .”
कसंबसं बोलून ती तिथेच उभी राहिली . आतून रडू फुटत होतं .
कळत नव्हतं तिला काही . पण काहीतरी वेगळं घडतंय हे जाणवत होतं .
तिनं रवीकडे पाहिलं . तो अंगार फुललेल्या डोळ्यांनी समशेर कडे पाहत होता .

समशेर शांतपणे साडीच्या निऱ्या काढत होता . साडी , दागिने , मेकअप झाल्यावर त्यानं पर्स खांद्याला लटकवली . आणि हायहिल्स घालून तो पाठी वळला .

” थांब . माझ्या एकाही प्रश्नाचं तू उत्तर दिलं नाहीस . ”
कमालीच्या शांतपणे रवीनं विचारलं .
समशेर पाठी वळला आणि सोफ्यावर बसला .

” ओके . याचा अर्थ तुम्हाला सगळं सांगायलाच हवं . कारण तुम्ही मला जन्म दिलाय . वाढवलंय . तुम्ही संस्कार केले आहेत . शिक्षण देताय .भरभक्कम पॉकेट मनी देताय . नो प्रॉब्लेम ! तुमच्या भाषेत आणि संस्कारात सांगायचं तर मी त्याबद्दल कृतज्ञ आहे . पण …”
तो थांबला .

” मला काही तरी वेगळं सांगायचं आहे पप्पा . मी साडी नेसलो म्हणजे हिजडा नाही झालो . मी गे नाही . लेस्बियन नाही . एल जी बी टी चा सदस्यही नाही . मी पुरूष आहे आणि पुरुषच राहणार आहे . शिक्षण , नोकरी , लग्न , मुलंबाळं हे सगळं होतच राहणार आहे . पण पप्पा , मम्मी हे दोन हजार चाळीस साल सुरू आहे . आणि नव्या काळानुसार तुमची सगळीच विचारसरणी प्रतिगामी आहे . बुरसटलेली आहे . आम्ही आता निसर्गाच्या विरोधात जगायचं ठरवत आहोत . प्रवाहाच्या विरुद्ध पोहणार आहोत . आम्ही साड्या नेसणार . दागदागिने घालणार . शरीर उघडं टाकणार . सगळी व्यसनं करणार . स्वतःपुरतं जगणार .स्वतःचाच विचार करणार . देश धर्म परंपरा गेल्या खड्ड्यात . मी , माझं माझ्यापुरतं ही आमची जगण्याची वृत्ती असेल . जेव्हा पैसे लागतील तेव्हा आम्ही सगळ्यांकडून ओरबाडून घेऊ . नीती नियम कायदे फाट्यावर मारू . त्यासाठी जाती जातीत भांडणे लावू . माझं ते माझंच पण तुझं तेही माझं अशी मस्त लाईफस्टाईल आणणार आहोत . अर्थात यासाठी अनेक देश स्पॉन्सरर होत आहेत . जगभरातला सर्व प्रकारचा मीडिया आम्हाला सहज उपलब्ध आहे . मूव्ही , वेब सिरीज आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही असे प्लॅटफॉर्म निर्माण होत आहेत .साड्या हे सिंबॉलिक आहे .आम्ही कृत्रिमपणे जगणार नाही . आम्ही स्त्रीपुरूष असा भेदभाव ठेवणार नाही . म्हणजे बलात्कार , अत्याचार खून खराबा होणारच नाही . उद्या माझ्यावर कुणी बलात्कार केला तर करणाऱ्यावर , आमच्यातला दुसरा कुणी बलात्कार करील . ही अशी एक छान लिंक लागेल . मग खऱ्या अर्थानं समान व्यवस्था आकाराला येईल . आणि तेच तर आमचं उद्दिष्ट आहे .मनाला येईल तसे आणि त्याचं पद्धतीने आम्ही जगणार आहोत . सगळं जग आमच्या विचाराने चालेल असा विश्वास आहे . बाय द वे माझ्याकरता जेवण शिजवून ठेवू नका . वाट बघू नका , माझ्याकडे किल्ली आहे . नो प्रॉब्लेम ! बाय . ”

समशेर हिल्स वाजवत निघून गेला .
रवी आणि रती त्याच्या जाण्याकडे बघत राहिली .

हा आपलाच मुलगा ना ?
काय होणारेय याचं ?
त्याहीपेक्षा या काळातल्या तरुण पिढीसमोर काय वाढून ठेवलंय ?
सगळी सिस्टीम उद्ध्वस्त करून यांना काय मिळणार आहे ?
ही तरुण पिढी कुणाच्या हातची कठपुतळी झाली आहे ?
कुठले विचार यांच्या मेंदूत घुसलेत ?
कुणी घुसवलेत ?
हे विचार प्रत्येक विद्यापीठात पसरत गेले तर …?

रवी विचार करून थकला . गांगरला आणि म्लान चेहऱ्यानं खाली बसला .

रती डोळे पुसून उठली .
बेडवरची समशेरची साडी व्यवस्थित घडी करून ठेवली .
आणि त्याच्या दुसऱ्या साडीला इस्त्री करू लागली .

भर दिवसा अंधार दाटला होता .
आणि सूर्योदय दृष्टिपथात नव्हता…!

( वास्तव वाटावी अशी भविष्यात घडू शकणारी काल्पनिक कथा)

— श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 116 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..