सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांचा आज जन्मदिवस….4 जानेवारी

इंदिरा संत यांच्या कवितेतून स्त्री जीवनाचे अनेक पैलू दिसतात अगदी स्त्रीच्या प्रेमापासून ते तिच्या सोसण्यापर्यंतचे. इंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध प्रसिद्ध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली. १९४६ साली त्यांचे पती नारायण संत यांचे निधन झाले. त्यानंतरच्या अनेक कवितात पतीवियोगाचे दुःख प्रतिबिबित झालेले दिसते. इंदिरा संत यांचा स्वभाव शांत , हळवा आणि चिंतनशील होता. त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली कारण त्यांच्याकडे निवडणूक जिंकण्याचे चातुर्य नव्हते की त्यासाठी जे काही लागते ते नव्हते. त्याचा हा पराभव त्यावेळी महाराष्ट्राच्या जिव्हारी लागला होता. त्याची कविता , त्यांचे लेखनच यासाठी महत्वाचे आहे अशी त्यांचे भाबडी समजूत होती. मला आठवतंय मी त्यांना नाशिकला जनस्थान पुरस्काराच्यावेळी भेटलो होततेव्हा त्यांना बघीतल्यावर समईमधील एक वात मंदपणे तेवत आहे. एक वेगळाच ऑरा म्हणतात तसा त्याच्या चेहऱ्याभोवती जाणवला. आज इतक्या वर्षणानंतरही मी ते तेज विसरू शकत नाही.
इंदिरा संत याना साहित्य अकादमीचा पुरस्कार , महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच कुसुमाग्रजाचा जनस्थान पुरस्कार लाभला होता. आजही इंदिरा संत यांची कविता वाचली जाते , अभ्यासली जाते. त्यांचे मराठी कवितेत स्थान उच्च दर्जाचे आहे.
अशा या इंदिरा संत यांचे १२ जुलै २००० साली निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply