नवीन लेखन...

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे छिन्नविच्छिन्न शिल्प

गुरुदेव ,

सांस्कृतिक संचित असणारे आपले प्रेरणादायी शिल्प , धर्मांधांनी नंगानाच करताना उद्ध्वस्त केले .

उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही .

गुरुदेव ,
आपल्या शिल्पावर पहिला घाव पडला तेव्हा … खरं सांगा गुरुदेव , आपल्या मनात हेच आलं असेल ना , की या सर्वांना परमेश्वराने माफ करावं .
खरं आहे ना ?

कारण आपली वृत्ती आध्यात्मिक होती . मानवता हा आपल्या जगण्याचा पाया होता . छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत होते . तुकोबांच्या अभंगांवर आपली निष्ठा होती . महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील संतपरंपरेचा तुम्हाला सार्थ अभिमान होता . हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आपल्या वर्तनातून पुढे चालवणाऱ्या तुम्हाला , राग लोभ द्वेष यापेक्षा दया क्षमा शांती चे संगीत अधिक प्रिय होते . त्यामुळेच तर रवींद्र संगीताची निर्मिती झाली .

गुरुदेव ,
चित्रकार , साहित्यिक , संगीतकार , शिक्षणतज्ज्ञ , तत्त्वज्ञ अशा अनेकविध भूमिका जगणाऱ्या आणि त्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या रविंद्रनाथांनी जागतिक स्तरावर खंडप्राय भारत देशाचे नाव किती उज्ज्वल केले आहे , हे त्या मूर्तीभंजकाना कसे ठाऊक असणार ? त्यांना फक्त उन्मादाची नशाच प्रिय . विध्वंस प्रिय . परंपरा तोडून टाकण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा प्रबळ . त्यांना काय कळणार तुमची प्रतिभा ?
त्यांना केवळ हिंसा आणि हिंसाच प्रिय .

गुरुदेव ,
परंपरेनं चालतं आलेली गुरुकुल शिक्षण पद्धती शांतिनिकेतनच्या स्वरूपात आपण पुन्हा सुरू केली हे त्या अक्षर शत्रूंना कसे कळणार ? आध्यात्मिक परंपरा श्रीनिकेतन च्या रुपात पुन्हा स्थापित केलीत, हे त्या नृशंसाना कसे पचनी पडणार ?
आपले अजरामर साहित्य , त्यामुळे मिळालेला नोबेल पुरस्कार हे त्यांच्या आकलना पलीकडील आहे . भारत आणि बांगला देशासाठी लिहिलेली आणि त्या देशाच्या राज्यघटनेने स्वीकारलेली दोन राष्ट्रगीते लिहिणारे या पृथ्वीवरील आपण असे एकमात्र कवी आहात , हे त्यांना कधीच कळले नसेल का ?

गुरुदेव ,
ज्या पद्धतीने त्यांनी तुमचे शिल्प फोडले , तोडले , अपमानित केले , हे पाहणे ही आमची हतबलता आहे . आमच्या राष्ट्रगीताचा निर्माता छिन्न विच्छिन्न होऊन पडला आहे , हे सत्य आता सर्वांनी स्वीकारले आहे .

गुरुदेव ,
तुमची इच्छा ही कविता या प्रसंगी आठवते आणि धीर देते …

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही .
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा !

माझ्या दुःखी, व्यथित मनाचं तू सांत्वन कर , अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा !

माझ्या मदतीला कुणी आलं नाही , तरी माझी तक्रार नाही .
माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा!

माझी फसवणूक झाली , तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही .
माझं मन खंबीर रहावं एवढीच माझी अपेक्षा !

माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही .
ते ओझं वाहून नेण्याची शक्ती माझ्यात असावी एवढी माझी अपेक्षा !

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन , मी तुझा चेहरा ओळखून काढेनच . मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल , तेव्हा , तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये , एवढीच माझी इच्छा !!!

श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 116 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..