नवीन लेखन...

विमर्श कथा : १

” स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला …”

तो गरजला .

आणि उत्स्फूर्तपणे जमलेली समोरची लाखोंची गर्दी आकाशाकडे हात फैलावत गरजली .

“वंदे मातरम्!”

तो अजून बोलत होता .

“राष्ट्रीय स्मारकांचा विध्वंस करून , या देशाच्या परंपरेशी , संस्कृतीशी , ज्ञानाशी आणि मातीशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांनो , तुमचा मेंदू सडलाय . स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रांतिकारक या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही जिवंत आहात . त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला म्हणून तुम्ही आज सुखासीन आयुष्य जगत आहात . त्यांची चरित्रं वाचा . त्यांचा त्याग , त्यांनी सोसलेल्या यातना , ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून अवघ्या देशाचा केलेला विचार , संघर्षमय आयुष्य हे सगळं माहितेय तुम्हाला ? हिंदुत्व , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न , हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यांचे संरक्षण याबद्दल केलेला विचार , देशाच्या एकात्मतेसाठी मांडलेल्या संकल्पना … यातलं काय माहितेय तुम्हाला ? परदेशातून येणाऱ्या अमाप पैशावर जगणारी तुम्ही बांडगुळे आहात , तुम्हाला काय माहिती सावरकर , काय माहिती देशहित ? तुम्ही सगळे देशाला लागलेली वाळवी आहात . देश आतून पोखरत जाणारी वैचारिक , षंढ वाळवी . भ्रम फैलावणारी वाळवी . संपत चाललेली पण संपता संपता देशाचं , समाजाचं , संस्कृती , किती नुकसान करता येईल याचा विचार करणारी वाळवी . त्यासाठी वापरत असलेल्या शब्दांना लाखो करोडो रुपये मलिदा मिळतोय , याच निर्बुद्ध जगण्यात स्वतःचं सुध्दा नुकसान होतंय हे विसरून गेलेली बधीर वाळवी”. तो क्षणमात्र थांबला .

” देहाकडून देवाकडे जाताना , देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो हा सावरकरांचा विचार लक्षात ठेवायला हवा . तुजसाठी मरण ते जनन , तुजविण जनन ते मरण हे सांगणारे सावरकर माहीत आहेत का तुम्हाला ? महान उद्दिष्टांसाठी केलेले बलिदान व्यर्थ जात नाही , हा केवढा मोठा विचार आहे मी जास्त काही बोलणार नाही , पण एक लक्षात ठेवा हिंदुस्थानशी गद्दारी करण्याचा , द्रोह करण्याचा आणि स्मारक उद्ध्वस्त करून परकीय शक्तींना पाय ठेवायला जागा मिळेल असं काही करण्याचा विचार करू नका . नाहीतर आम्ही आहोत तुमचा यथायोग्य समाचार घ्यायला . स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे शब्दही नीट ध्यानी ठेवा . अगर आप वास्तव में स्वतंत्र रहना चाहते हैं , तो कोई भी आपको गुलाम नही बना सकता , बस , आपको अपनी पहचान को धूमिल नहीं होने देना हैं l ”

तो बोलायचा थांबला आणि लाखोंच्या गर्दीने त्याच्या सुरात सूर मिसळला .
भारावलेली गर्दी उंच स्वरात ललकारली …

वंदे मातरम् l

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या किरणांना प्रेरणा देण्यासाठी आकाशातील सूर्यसुध्दा प्रखरतेने तळपू लागला .

स्मारकाच्या रक्षणासाठी सगळ्यांची पावले पुढे चालू लागली …

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 125 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..