नवीन लेखन...

विझलेली पणती

संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।

पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।

दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।

— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..